Popular posts from this blog
पुन्हा शाळेची घंटा वाजण्याची मुले पाहताहेत आतुरतेने वाट!
'सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?' शाळेत असतांना हे गीत प्रत्येकांच्या ओठांवर असे. हे गीत ऐकल्यावर प्रत्येकाला शाळेतील ते मौजमजेचे, खोडकर आणि धम्माल दिवस नक्कीच आठवत असतील. प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांनी लहान मुलांच्या मनातील भावविश्व ओळखून 'पाऊस पडून शाळेला सुट्टी मिळेल काय' अशी भोलानाथकडे या गीतातून मजेशीर विचारणा केली होती. शाळेला सुट्टी मागण्याचे किंवा मिळवण्याचे हे चित्र आता मात्र पुर्णपणे बदलले आहे. आणि शाळा पुन्हा कधी सुरू होईल याची मुले आतुरतेने वाट पाहत आहेत. याचे कारण मागील दीड वर्षांपासून सर्व शाळा बंद आहेत आणि मुले घरीच बसून ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. पण लहान मुले आता या लॉकडाउनला कंटाळली आहेत. त्यांना शाळेत जायचे आहे. या बंधनातून बाहेर पडायचे आहे. म्हणूनच पुन्हा पूर्वीसारखी शाळेची घंटा वाजून शाळा सुरू होण्याची ते आतुरतेने वाट पाहत आहेत. विशेष म्हणजे शाळा बंद असल्याचा आणि लॉकडाउनचा मुलांवर भावनिक, शारीरिक, सामाजिक अशा विविध अंगांनी परिणाम होत आहे. शिवाय मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या वर्षी ऑग...
LSC आयोजित जीवन कौशल्य मूल्यांकन साधनसंच प्रमाणीकरण कार्यशाळा संपन्न!
लाइफ स्किल्स कोलॅबोरेटिव्ह (LSC) आयोजित राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र व शांतिलाल मुथ्था फाउंडेशनच्या सहकार्याने दि. ७ व ८ डिसेंबर २०२१ रोजी जीवन कौशल्य मूल्यांकन साधनसंच प्रमाणीकरण कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत एससीईआरटीचे उपसंचालक डॉ. विकास गरड आणि एसएमएफचे सीईओ श्री. विशाल फणसे यांनी मार्गदर्शन केले. तसेच सहभागी एससीईआरटीचे प्रतिनिधी आणि सहा जिल्ह्यातील डायटच्या तज्ज्ञांनी मूल्यांकन साधनसंचांवर अभिप्राय दिले. लाइफ स्किल्स कोलॅबोरेटिव्ह यांच्या सहयोगाने किशोरवयीन विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्य आणि शिक्षकांच्या जीवन कौशल्यविषयक तयारीचे मापन करण्यासाठी विविध मूल्यांकन साधनसंच विकसित केले आहेत. त्याच्या प्रमाणिकरणासाठी सदर कार्यशाळा आयोजित केली होती.
Comments
Post a Comment